Wednesday, 25 September 2024

29 ऑक्टोबर रोजी शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन

 

 

जालना, दि. 25 (जिमाका) :- सर्व भारतीयांसाठी 29 सप्टेंबर हा दिवस अभिमानाचा आहे.  कारण या दिवशी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहचविणे तसेच माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करणे यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी जालना येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात रविवार दि.29  ऑक्टोबर 2024 रोजी शौर्य दिन आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक, विधवा व त्यांच्या अवलंबितांसह नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

 


 

जालना, दि. 25 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार अनिल नव्हाते यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

                                                 -*-*-*-*-

माजी सैनिकांसाठी मेळावा

 

जालना, दि. 25 (जिमाका) :- मराठवाडा विभागातील माजी सैनिक, वीर नारी, वीर पिता, वीर माता व सर्व वयोवृध्द सैनिकांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील 97 आर्टीलरी ब्रिगेड सर्वत्रा ऑडीटोरियममध्ये शुक्रवार दि.27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी  6 वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेंशन व स्पर्शसंबंधीत असलेल्या सर्व अडचणींचे निरसन करण्यासाठी पुणे येथील प्रधान नियंत्रक रक्षा लेखा कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday, 23 September 2024

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना प्रतिष्ठित ‘गोल्डन स्कॉच’पुरस्कार * जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वीकारला पुरस्कार*

 



जालना, दि.23 (जिमाका) :  जालना जिल्ह्याने रेशीम अंडीपुज निर्मितीपासून ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मलबेरी सिल्क सॉईल टू फॅब्रिक प्रोसेस अंडर वन रुफ’ हा प्रकल्प उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा ‘स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार’ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना प्रदान करण्यात आला.

स्कॉच या संस्थेकडून विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीकरीता दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रेशीम प्रक्रिया उद्योगासाठी विविध सकारात्मक पाऊले उचलण्यात आल्याने रेशीम प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला यश आले. याच कामाची दखल घेत स्कॉच संस्थेच्यावतीने श्री. पांचाळ यांची या पुरस्कारासाठी निवड केली. स्कॉच संस्थेच्यावतीने नवी दिल्ली येथे शनिवार, 21 सप्टेंबर रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रेशीम विकास अधिकारी श्री. मोहिते यांनी जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांच्यावतीने  हा  पुरस्कार स्विकारला होता. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  रेशीम उपसंचालक डॉ. महेंन्द्र ढवळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला.

यावेळी डॉ. पांचाळ म्हणाले की, जालना जिल्ह्यात हा रेशीम प्रकल्प यशस्वी करण्याकरीता रेशीम अधिकारी अजय मोहिते, तहसिलदार विक्रांत मुंढे, अंबडचे तत्कालीन  तहसिलदार चंद्रकांत शेळके, घनसावंगी तहसिलदार श्रीमती योगिता खटावकर यांचे सहकार्य लाभले. या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना समृध्दी प्राप्त होऊन रोजगार निर्मितीत नक्कीच वाढ होईल.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, दिपक पाटील, डॉ. दयानंद जगताप, पद्यमाकर गायकवाड यांच्यासह सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

रेशीम कोष बाजार पेठ तसेच महिको यांच्यामार्फत रेशीम अंडीपुज निर्मिती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बीजकोषाला 1 लाख 13 हजार रुपये प्रती क्विटंल दर बीज कोष निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पटीने वाढले आहे. तसेच रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया उपलब्ध असणारा जालना हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे. जालन्याच्या रेशीम कोष बाजारपेठेत राज्यातील सर्व जिल्ह्यांतुन शेतकरी रेशीम कोष विक्री करण्याकरीता येतात. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन जालना जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उद्योगाकडे वळत आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीकरीता प्रशिक्षण संपन्न

 





        जालना, दि.23 (जिमाका) : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी यांच्या सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी  प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने यावेळी  प्रशिक्षणात पात्रता-अपात्रता, नामाकंन, गुन्हेगारी पूर्ववृत्तांबद्दल सूचना, नामांकन सुरक्षा, मतदान केंद्र तपासणी, अतीसंवेदनसिल मतदान केंद्र निश्चित करणे, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्राचे नियोजन, एमसीएमसी, पेड न्यूज, आदर्श आचारसंहितेचा भंग, स्वीप, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट, पोस्टल मतदान,  सी-व्हीजील प्रणाली आदी विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, विधानसभा निवडणूकीसाठी खुप कमी कालावधी राहिला आहे. याकरीता निवडणूक प्रक्रियेतील सर्व यंत्रणांनी निवडणुकीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे पार पाडावीत. तसेच सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची पूर्वतयारी करावी.

 यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार,जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना अधिकारी आर. पी. पडळकर,उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, डॉ. दयानंद जगताप, पद्यमाकर गायकवाड यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणास सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

****

 

जालना जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

जालना, दि. 23 (जिमाका)-  प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दिनांक 23  ते दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिनांक 23 ते 26 सप्टेंबर 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिनांक 23  ते दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) मुसळधार  स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, दिनांक 23  ते 26 सप्टेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिनांक 23 ते 26 सप्टेंबर 2024 रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.  शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.  जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) शशिकांत हदगल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Tuesday, 10 September 2024

मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

 

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा


 

जालना, दि. 10 (जिमाका) :- मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असुन विजेच्या कडकडाटासह दि. 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2024 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 -*-*-*-*-

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे ऑनलाईन उदघाटन

 

 

जालना, दि. 10 (जिमाका) :- देशाचे महामहिम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने रविवार दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता संविधान‍ मंदिराचे उदघाटनाचे चंदनझिरा येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. री सर्व विद्यालयीनमहाविद्यालयीन विद्यार्थी व शहरातील नागरिकांनी या उदघाटनपर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            संविधान‍ मंदिर उदघाटन कार्यक्रमास शहरातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. उदघाटनपर कार्यक्रम जालना येथील चंदनझिरा परिसरातील एसटी कार्यशाळेच्या बाजूस असलेल्या शासकी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, कायदेविषयक मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असेही सहा.प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 4 September 2024

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी - जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ · कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर

 

 

        जालना, दि. 4 (जिमाका) :- महसूल व वन विभाग शासन निर्णयान्वये ई-पीक पाहणी बाबतची माहिती भ्रमणध्वनीमधील अॅपद्वारे गाव नमुना 12 मध्ये नोंदविण्यासाठी कार्यपध्दती निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ई-पीक पाहणी प्रकल्प क्षेत्रीय स्तरावर महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ई-पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करणार नाहीत त्यांना पीक कर्ज, पीक विमा, नुकसानभरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ मिळणार नाही. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या, अनुषंगाने सर्व तालुकास्तरावर प्रचार प्रसार, प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणीची नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. जालना जिल्ह्यात दि. 1 ऑगस्ट 2024 पासून खरीप हंगाम ई-पीक पाहणीची सुरवात झाली असून चालु हंगामासाठी सुधारित मोबाईल ई- पीक पाहणी अॅप (डीसीएस) व्हर्जन 3.0.0.0 गुगल प्लेस्टोअरवर  उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

वर्ष 2023 च्या खरीप हंगामातील कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभागाच्या दि. 29 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय देण्यासाठी सुचित केले आहे. या शासन निर्णयात राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक अॅप,  पोर्टलव्दारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील.  ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणात परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. याप्रमाणे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत. मोबाईल अॅप प्रणालीवर पीक पेरा नोंदणीबाबत सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर प्रचार, जनजागृती करण्यात आलेली आहे.

-*-*-*-*-

 

इस्त्राईल देशात कुशल उमेदवारांना रोजगाराची संधी


 

        जालना, दि. 4 (जिमाका) :- राज्यातील कुशल बेरोजगार युवक-युवतींना इस्त्राईल येथे रोजगारासाठी महाराष्ट्र शासनाने योजना तयार केली आहे. यामध्ये बांधकाम तसेच नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रातील 1 लाख उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील कुशल बेरोजगार युवक-युवतींना इस्त्राईल देशामध्ये रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण झाली असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            उमेदवाराची इस्त्राईल देशामध्ये काम करण्याची इच्छा असावी. उमेदवाराला जुजबी इंग्रजी विषयाचे ज्ञान असावे तसेच क्षेत्रासंबंधी प्राथमिक कौशल्य व प्रमाणपत्र असावे. किमान सहा महिने वैध असणारा पासपोर्ट असावा. तसेच वय 25 ते 45 दरम्यान असावे. यामध्ये किमान शिक्षणाची अट नाही तसेच कोणताही प्रदीर्घ आजार झालेला नसावा. अशी उमेदवारासाठी पात्रता  ठेवण्यात आलेली आहे.

            इस्त्राईल येथे नौकरी मिळविण्यासाठी  महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीपत्राचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येईल. प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजित 1 लाख रुपयांपर्यंत मासिक वेतनाची संधी व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी हेल्पलाईन 18001208040 यावर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

 

 

जालना, दि. 4 (जिमाका) :- अंबड येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-1 व 2 अंतर्गत मदतनीस 51 पदे मानधनावर भरली जाणार आहेत. मदतनीस पदासाठी पात्रता, रहिवास, नियम व अटींच्या जाहिरनामासह अर्जाचा नमुना संबंधित महसूली गावच्या ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहे. तरी स्थानिक इच्छुक महिला उमेदवारांनी आपले अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती, अंबड येथे मंगळवार दि.24 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अंबड एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे बाल विकास  प्रकल्प अधिकारी एस.एल.नागरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-